‘मुर्दाबाद’ हा शब्द भाजप आणि आरएसएसचे लोक वापरतात, आपण नाही – राहुल गांधी

‘मुर्दाबाद’ हा शब्द भाजप आणि आरएसएसचे लोक वापरतात, आपण नाही – राहुल गांधी

ओदिशा –  ओदिशामधल्या राउरकेला येथे आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. राफेल घोटाळा समोर आला आहे तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हावभाव बदलले आहेत. ते हताश झाले आहेत. त्यांना सगळीकडे राफेल, शेतकरी, महिला दिसतात. मात्र आम्ही द्वेषापोटी हे सगळ केलं नाही, आम्ही प्रेमाने त्यांना प्रश्न विचारला होता. आम्ही प्रेमाचा मार्ग अवलंबला असल्याचं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी राहुल गांधी कार्यकर्त्यांना शांत करत , ‘मुर्दाबाद’ हा शब्द भाजप आणि आरएसएसचे लोक वापरतात, आपण नाही. आपण प्रेम आणि स्नेहावर विश्वास ठेवतो.त्यामुळे नरेंद्र मोदी मुर्दाबाद या घोषणा देऊ नका, अशा सूचना  राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

COMMENTS