मुंबईकरांनो काळजी घ्या, स्थानिक प्रशासनच कोसळलंय – राहुल गांधी

मुंबईकरांनो काळजी घ्या, स्थानिक प्रशासनच कोसळलंय – राहुल गांधी

मुंबई – अंधेरी येथे पूल कोसळल्यामुळे मुंबईकरांचे आज चांगलेच हाल झाले असल्याचं पहावयास मिळालं आहे. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून पावसामुळे रस्त्यांवरही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी राहुल गांधी यांनी आवाहन केलं असून मुंबईकरांनो काळजी घ्या, स्थानिक सरकारच कोसळलं असल्याचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान या दुर्घनेची दखल राहुल गांधी यांनी घेतली असून त्यावर त्यांनी ट्वीट केलं आहे. ‘कोसळणारे ब्रिज, रस्त्यांवर पूर, अडकलेले नागरिक, स्थानिक प्रशासनच कोसळलंय, मुंबईकरांबद्दल मला सहानुभूती आहे, काळजी घ्या सुरक्षित राहा असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

 

COMMENTS