त्यामुळेच तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव – राज ठाकरे

त्यामुळेच तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव – राज ठाकरे

नाशिक – मनसे राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदींवरील रागामुळे तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला असून विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात, असे सांगत लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचे धोरणच भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे सरकार बेकार असल्याचंही राज ठाकरे यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचं असेल तर पाहावं. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल, आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. कॉम्प्यूटर वा मोबाइलवरील माहिती तपासण्याचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी जारी केला त्यावरुन ते बोलत होते.

तसेच भाजपा आधी पायावर फावडा मारेल, मग कुदळ मारतील, दोन्ही एकाच वेळी मारणार नाही, असे सांगत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नसल्याचंही यावेळी म्हटलं आहे. तसेच सरकारच्या तिजोरीत पैसा नसताना

कांदा उत्पादुकांना अनुदानाची घोषणा का केल्या जातात?, पैसा नसताना कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केले, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.

 

COMMENTS