देशभरात तणनाशके मारून औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नाही – राजू शेट्टी

देशभरात तणनाशके मारून औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नाही – राजू शेट्टी

कोल्हापूर – शेती कशी कसायची आणि तण कसे काढून टाकायचे ते मला चांगले समजते, देशातल्या कमळांवर तणनाशके मारून औषधालाही कमळ शिल्लक ठेवणार नसल्याची जोरदार टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  विद्यार्थ्यांच्या उपजत गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. पण सरकारच्या शाळा बंदच्या धोरणामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर होत असल्याचंही यावेळी शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अच्छे दिनच्या भुलभुलैय्याला भुललो, त्यामुळे त्यांच्याकडे गेलो. मारुतीच्या बेंबीत गारवा नसून विंचूच असल्याचे समजल्यावर प्रामाणिकपणे माघारी फिरलो. सत्तापरिर्वतनाचा मला दंश बसला आहे. त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हणत राजू शेट्टी यांनी भाजपात प्रवेश न करण्याचा सल्लाही यावेळी इतर नेत्यांना दिला. तसेच यावेळी बोलत असताना सतेज पाटील यांनीही कोणत्याही परिस्थिती भाजपची वाट धरणार नसल्याचं म्हटलं आहे.

 

COMMENTS