कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा –राजू शेट्टी

कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा –राजू शेट्टी

पैठण (औरंगाबाद)  – राज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्यानं राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्येचा विचार करू नका, स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे , असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. आहे शेतकरी सन्मान अभियानामध्ये आजचा शेतकरी मेळावा एकनाथांच्या पैठण नगरीत संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.

कर्जबाजारी शेतकऱ्यांनो दीड वर्ष कळ सोसा, तुम्हाला फसवणाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टीं यांनी दिला.पंतप्रधान राज्यातल्या शेतकर्यांनी पीक विमा योजनेत नऊ हजार कोटी रुपयांचा भरणा केला. त्या बदल्यात शेतकऱ्यांना भरपाई म्हणून फक्त हजार अकराशे कोटी रुपये माघारी मिळाले. मग ही योजना कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी? असा सवाल खासदार राजू शेट्टीं केला आहे. शेतमालाला दिडपट हमीभाव, सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा ही दोन खासगी विधेयके अखिल भारतीय किसान संघर्ष समिती संसदेत मांडणार असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे .

या अभियानात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही.एम.सिंग, पश्चिम बंगाल किसान संघटनेचे अविक शहा हे  सहभागी झालेत. त्यापूर्वी शेतकरी सन्मान यात्रेचं पैठणमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्याची वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

COMMENTS