संपूर्ण देशात जे झालं ते हातकणंगलेमध्ये झालं – राजू शेट्टी

संपूर्ण देशात जे झालं ते हातकणंगलेमध्ये झालं – राजू शेट्टी

मुंबई – गेली 10 वर्ष मी हातकणंगलेचं नेतृत्व केलं होतं. संपूर्ण देशात जे झालं ते हातकणंगलेमध्ये झालं असल्याचं वक्तव्य स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे.आम्ही चळवळीतून पुढे आलोय आज चळवळीची गरज आहे.
लवकरच स्वाभीमानी शेतकरी संघटना राज्यव्यापी दुष्काळ प्रश्नी आंदोलन करणार असल्याचही शेट्टी यांनी जाहीर केलं आहे.
लढण्याची मानसिकता आमच्यात आहे.
एकत्र पुढे जाण्याचा विचार करायचा, जे छोटे मोठे घटक राहिले आहेत त्यांना बरोबर घ्यायचे
असल्याचंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजू शेट्टी यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले या मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर आज शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सोमवारी राजू शेट्टी यांनी पराभवाच्या पार्श्वभूमीवर कवितेच्या माध्यमातून खचून न जाता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा व्यक्त केला होता. ‘आजपासून..’ या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी नसलो तरी चळवळीला बांधील असून मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो ,याची मनात खंत आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

COMMENTS