राज्यपालांकडे रामदास आठवलेंनी केली ही मागणी !

राज्यपालांकडे रामदास आठवलेंनी केली ही मागणी !

मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री पायल घोष यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी मी याबाबत गृहमंत्र्यांशी बोलतो, असे सांगितले असल्याचं आठवले म्हणाले. अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आज रामदास आठवले, पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली.

COMMENTS