आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारा पहिला मुख्यमंत्री, रामदास आठवलेंकडून फडणवीसांचं कौतुक !

आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारा पहिला मुख्यमंत्री, रामदास आठवलेंकडून फडणवीसांचं कौतुक !

मुंबई – राज्यात भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबत विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहेत. तर भाजपचे मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. आंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद करावी लागेल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आंबेडकरी जनतेसाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी वाहणारे मुख्यमंत्रीही ठरले असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारची चार वर्षे ही महाराष्ट्राच्या शाश्वत प्रगतीचा पाया रचणारी ठरणार असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. या चार वर्षात तरुण, अभ्यासू, उत्साही, हसतमुख आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सतत नव्या निर्मितीची धडपड असणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनमानसावर आपली मुद्रा देवेंद्र फडणवीस यांनी उमटवली आहे. महाराष्ट्रात अनेक गड बालेकिल्ले जिंकता येतील, मात्र कोणत्याही राजकीय योद्ध्याला आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकता येणे शक्य नसते. देवेंद्र फडणवीस यांनी हा बालेकिल्ला जिंकला असल्याचंही यावेळी रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS