रामदास कदम आणि नितेश राणेंमध्ये जुंपली, एकमेकांवर जोरदार टीका!

रामदास कदम आणि नितेश राणेंमध्ये जुंपली, एकमेकांवर जोरदार टीका!

मुंबई – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेता रामदास कदम आणि नितेश राणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आमदार नितेश राणेंनी रामदास कजम यांना  प्रत्युत्तर देताना रामदास कदमांची तुलना थेट कुत्र्यासोबत केली आहे.नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’ अशी झोंबणारी टीका कदम यांनी केली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं असल्याची आक्षेपार्ह टीका केली आहे. ”स्व. मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..उद्धव ठाकरें नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे…रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं झोंबणारं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

तर या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये आलेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष बाकी राहिलाय. राणे बघावं तेव्हा मातोश्रीवर टीका करतात. मात्र, आपली तेवढी औकात आहे का, हे त्यांनी तपासून बघावं. याच शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यामुळे मातोश्रीवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही अशी टीका कदम यांनी केली होती.

COMMENTS