व्यापा-यांकडून पैसे घेऊन शिवसेनेची बदनामी, राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे – रामदास कदम

व्यापा-यांकडून पैसे घेऊन शिवसेनेची बदनामी, राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे – रामदास कदम

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात प्लास्टिकबंदीवरुन चांगलच शाब्दीक युद्ध सुरु झालं असल्याचं दिसत आहे. रामदास कदम यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली असून राज ठाकरे यांचा पक्ष संपला आहे. सुपारी घेऊन शिवसेनेची बदनामी केली जात असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे. राज ठाकरे हे नऊ महिने झोपले होते का ? त्यांच्या पक्ष संपला आहे. असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान घाटकोपरमधील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. प्लास्टिक बंदीचं जगभरातून स्वागत केलं जात असून इंग्लड सरकारही या निर्णयाला फॉलो करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे चुकले असून त्यांनी या निर्णयाचं स्वागत करायला हवं होतं. परंतु असं न करता व्यापा-यांकडून पैसे घेऊन ते शिवसेनेची बदनामी करत आहेत. तसेच ते काळ्या मांजरासारखं आडवे येत असल्याची टीकाही रामदास कदम यांनी केली आहे.

COMMENTS