त्यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या – रावसाहेब दानवे

त्यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या – रावसाहेब दानवे

औरंगाबाद – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार मोर्चेबांधणीला लागले आहे. याबाबत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीची रंगत येऊ देण्याचा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. देशातील प्रत्येक घडामोडीवर जनतेचे लक्ष आहे. याच घडामोडी निवडणुकीशी जोडल्या जाणार आहेत. या पुढचा काळ हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. देशातील नेते,मतदार हे निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करायला लागले आहेत. त्यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या असं दानवे यांनी म्हटलं आहे. भाजपतर्फे औरंगाबाद शहर व ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची खासदार दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भानुदास चव्हाण सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीतून बूथ विस्तार आणि कामकाजांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान सध्या राजकीय घडामोडीचा काळ आहे. याच घडमोडीवर लोकांचे लक्ष आहे. यामूळे यात आपण मागे पडलो तर मागे पडल्याचीही चर्चा लोक करतील. तुमच्यात उत्साह राहू द्या, निवडणुकीच्या रंगात रहा. आपले एक बुथ पंचविस युथची हे पाहून कॉंग्रेस आणि इतर अन्य राजकीय पक्षांनी एक बुथ पाच युथ आणि बैठका सुरु केल्या आहेत.आपण हे अगोदरच केले होते. यामूळे आपले काम 20 सप्टेंबरच्या आत संपवण्याचे आदेशही यावेळी दानवे यांनी दिले आहेत.

 

COMMENTS