…अन् मालकाच्या धाकानं कोंबड्यानंच दिलं अंडं, रावसाहेब दानवेंच्या किस्स्यामुळे सभागृहात पिकला हशा !

…अन् मालकाच्या धाकानं कोंबड्यानंच दिलं अंडं, रावसाहेब दानवेंच्या किस्स्यामुळे सभागृहात पिकला हशा !

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितलेल्या या किस्स्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देत मालकाच्या दट्ट्यामुळे कोंबडीऐवजी कोंबड्यानच कसं अंडं दिलं हा किस्सा दानवे यांनी सांगितला आहे. अनेक कार्यक्रम दिले म्हणून तुम्हाला वाटेल हे सगळं कसं करायचं. पण तुम्हाला हे करावंच लागेल असं दानवेंनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं.

रावसाहेब दानवेंनी सांगितलेला किस्सा

एका शेतकऱ्याचा कोंबडी पालनाचा धंदा तोट्यात गेला. खाद्य जास्त आणि उत्पन्न कमी झालं. त्याने नोकराला बोलवून सांगितलं कोंबड्यांनी प्रत्येकी दोन अंडी नाही दिली तर धंदा बंद. नोकराने कोंबड्यांना सांगितलं अंडी द्यावीच लागतील. पण त्यापैकी एका कोंबडीने एकच अंडं दिलं. मालकाने कसं ते विचारल्यावर कळलं ती कोंबडी नाही कोंबडा होता. पण मालकाच्या धाकाने एक अंडं द्यावं लागलं.

दरम्यान असंच आपल्याला धाकाने का होई ना कार्यक्रम पूर्ण करावेच लागतील असा आदेश यावेळी रावसाहेब दानवेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. दानवेंनी दिलेल्या या किस्स्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून मोदी – शाह जोडीची दहशत आणि धाक भाजपमधील नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर किती आहे हे अप्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न दानवेंनी केला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS