…तरीही भाजपला काही फरक पडणार नाही – रावसाहेब दानवे

…तरीही भाजपला काही फरक पडणार नाही – रावसाहेब दानवे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एकत्रित प्रवास केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र निवडणूक लढवली तरीही भाजपाला फरक पडत नसल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.कारण भाजपा नशिबाच्या जोरावर निवडणूक लढवत नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवस्मारक राजभवनच्या जागी उभारावे या मताशी आम्ही सहमत नसल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवस्मारक राजभवनात उभारलं गेलं पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच मागच्या सरकार पासून ही प्रक्रिया सुरू आहे. भूमिपूजन झालं आहे. आता स्मारक उभारण्याची प्रक्रियादेखील सुरू झालीये. आता असे वक्तव्य करून काही बदल होईल असं वाटत नसल्याचंही दानवेंनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS