राजापूरमधल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातला वाद पुन्हा पेटला, ग्रामस्थांची एकास मारहाण !

राजापूरमधल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातला वाद पुन्हा पेटला, ग्रामस्थांची एकास मारहाण !

रत्नागिरी – राजापूरमधल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधातला वाद पुन्हा  एकदा पेटला असल्याचं पहावयास मिळालं आहे. या प्रकल्पाविरोधात घेण्यात आलेल्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. या बैठकीत ग्रामस्थ महिलांनी एका व्यक्तीला जोरदार चोप दिला आहे. ही व्यक्ती दलाल असल्यामुळे त्याला मारहाण केली असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

दरम्यान नाणार रिफायनरी प्रल्कल्पविरोधात कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती मुंबई यांनी राजापूरच्या कुंभवडे हायस्कूलमध्ये बैठक आयोजीत केली होती. या बैठकीदरम्यान एक व्यक्ती दादागिरी करत होती आणि तो एक दलाल असल्याचा आरोप कुंभवडे येथील महिलांनी केला आहे. या घटनेवरुन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून जोरदार विरोध असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS