शेतक-यांच्या आंदोलनाबाबत अभिनेत्री रविना टंडनचं वादग्रस्त ट्वीट !

शेतक-यांच्या आंदोलनाबाबत अभिनेत्री रविना टंडनचं वादग्रस्त ट्वीट !

मुंबई   देशभरात सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाबाबत अभिनेत्री रविना टंडननं वादग्रस्त ट्वीट केलं आहे. या शेतक-यांच्या आंदोलनावर रविनाने टीका केली असून अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांना जामीनही देऊ नका असं रविनानं या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान हे आंदोलन “अतिशय क्लेशदायक असून आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी घटना आहे. आंदोलकांना तातडीने अटक करायला हवं आणि त्यांना जामीनही देऊ नये. असं या ट्वीटमध्ये रविनानं म्हटलं आहे.

दरम्यान रविनाने केलेल्या या ट्वीटचा देशभरातून निषेध केला जात आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, याकडे दुर्लक्ष करुन रविना टंडनने नेमके आंदोलनातील नासधुसीवर बोट ठेवल्यामुळे तिचा निषेध केला जात आहे. श्रीनिधी मिश्रा नावाच्या व्यक्तीने रविनाचा प्रतिवाद करताना म्हटले, “जर शेतकरी सुट्टीवर गेले, तर जग उपाशी राहील आणि मग तुम्हाला खायलाही मिळणार नाही, पर्यायाने तुम्ही असे हे मोफत इंटरनेट वापरण्यासाठी जगूही शकणार नाहीत.”

त्यानंतर या ट्वीटला रविनाने प्रत्युत्तर दिलं असून “मग तुम्ही काय करताय मोफत इंटरनेट वापरुन? तुम्हीही मोफत इंटरनेट वापरणं बंद करा आणि नासाडीला समर्थन करण्याऐवजी मदतीसाठी विचार करा असं ट्वीट रविनाने केलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाबाबतचा नवीन वाद रविनाने ओढावून घेतला असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS