शेट्टी-सदाभाऊ वाद चिघळला, इस्लामपूरमधील स्वाभिमानीचं कार्यालय फोडलं !

शेट्टी-सदाभाऊ वाद चिघळला, इस्लामपूरमधील स्वाभिमानीचं कार्यालय फोडलं !

सांगली – राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद आता चिघळला असल्याचं दिसत आहे. सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले आहेत. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे ख़ासदार राजू शेट्टी यांचा प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले आहे.

दरम्यान इस्लामपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालयही या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले आहे. या कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि बोर्डाची नासधूस करण्यात आली असून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यानी हे आंदोलन केले आहे. त्यामुळे सदाभाऊंच्या संघटनेला उत्तर देण्यासाठी राजू शेट्टींच्या संघटनेनंही तोडफोड केल्यामुळे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद चिघळला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS