भाकरी नाही तर पीठच बदलायची गरज, रोहित पवारांच्या पोस्टमुळे पक्षात खळबळ !

भाकरी नाही तर पीठच बदलायची गरज, रोहित पवारांच्या पोस्टमुळे पक्षात खळबळ !

मुंबई – राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त भाकरीच नाही तर पीठसुद्धा बदलायची गरज असल्याची पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 20 वा वर्धापनदिन आहे. त्याच निमित्ताने रोहित यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. रोहित पवारांच्या या पोस्टमुळे रोहित पवार यांचा नेमका डोळा कोणावर आहे. आणि पीठ बदलण्याची गरज म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना डच्चू दिला जाणार का अशी चर्चा पक्षीय वर्तुळात सुरु आहे.

https://m.facebook.com/RohitPawarOfficial/photos/a.226136124516804/667671117029967/?type=3&refsrc=http%3A%2F%2Fwww.thodkyaat.com%2Frohit-pawar-facebook-post%2F

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीला भाकरी बदलणार म्हणजे तरूण कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी देणार असल्याचं काल पवारांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होते. त्यानंतर आज रोहित यांनी पोस्ट लिहिली आहे. भाकरीच नाही तर पीठच बदलणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी 20 वा वर्धापनदिन म्हणजे तरूणांच्या वयाप्रमाणे 20 वर्ष समजून तरूणांना अधिकाधिक संधी देत पक्षसंघटना वाढविण्यावर भर देण्यात यावा, असं म्हटलं आहे.

COMMENTS