धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

मुंबई – धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रीय समाज पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोलताडे यांनी याबाबत पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना धनगर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करण्यात येणार याबाबत विचारलं आहे. आरक्षणाबाबत राज्य टीसचा सकारात्मक टीसचा अहवाल केंद्राला पाठवून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता आपल्या नेतृत्याव धनगर समाजाला एसटीत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी बाळासाहेब दोलताडे यांनी केली आहे. त्यामुळे दोलताडे यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS