शुभ बोल ना-या, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला !

शुभ बोल ना-या, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला !

नवी दिल्ली – राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील शेतीविषय प्रश्नांची सोडवणूक करण्याचं साकडं नितीन गडकरींना घातलं. दुध उत्पादक शेत-यांना निर्यातीसाठी अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी गडकरींकडे केली. दुधाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रातील दुध उत्पादन संस्था आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दुध पावडर निर्यातीवर प्रति किलो ५० रूपये अनुदान देण्याची मागणी खोत यांनी गडकरी यांच्याकडे केली.

केंद्र सरकारने नुकतेच उसाला मोठे पॅकेज जाहीर केले आहे. याचे श्रेय राजू शेट्टी घेत असल्याबद्दलही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला. कधीतरी शुभ बोल ना-या अशा शब्दात त्यांनी राजू शेट्टी यांना टोला हाणला.

COMMENTS