माझ्या शापामुळेच शहीद हेमंत करकरेंचा सर्वनाश, साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त विधान !

माझ्या शापामुळेच शहीद हेमंत करकरेंचा सर्वनाश, साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त विधान !

नवी दिल्ली – शहीद हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मालेगाव स्फोटातील आरोपी आणि भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात माझ्याविरोधात पुरावे नसतानाही हेमंत करकरेंनी हेतुपूरस्कपणे कारवाई केली, असा दावा साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे. त्या भोपाळमधील सभेत बोलत होत्या.

दरम्यान हेमंत करकरे यांनी साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे.

COMMENTS