आपण चुकीचे निर्णय घेतोय, म्हणून गाढवं निवडून येतात, हार्दिक पटेल यांची सांगलीत भाजपवर जोरदार फटकेबाजी !

आपण चुकीचे निर्णय घेतोय, म्हणून गाढवं निवडून येतात, हार्दिक पटेल यांची सांगलीत भाजपवर जोरदार फटकेबाजी !

सांगली – आपण चुकीचे निर्णय घेतोय, म्हणून गाढव निवडून येतात, जागृत व्हा, गाढवांना निवडून देऊ नका असं आवाहन गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे. महाराष्ट्रात म्हणतात भाजपाची ताकत आहे, तसं काही नसतं ओ…पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रात मोदी, अमित शहा यांच्यासारखे गुंडे तर इथं नाहीत ना ? त्यामुळे जागृत व्हा आणि सत्ता उलथवा असं आवाहन हार्दिक पटेल यांनी केलं आहे. धनगर आरक्षणासाठी सांगली आरेवाडीत मंगळवारी गोपीचंद पडळकर यांच्या गटाचा दसरा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यासाठी हार्दिक पटेल यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान आरक्षण ही भीक नाही, तो एक अधिकार आहे. नागपूरवाले हे मूलनिवासी नाहीत, आपण मूलनिवासी आहोत. तसेच हमने गौरोसे आझादी ली लेकीन चोरोके बीच हम अटके हुवे हे अशी जोरदार टीकाही हार्दिक पटेल यांनी यावेळी केली आहे. तसेच जे जे समाजं आरक्षण मागत आहेत, त्या समाजाविरोधात,आरएसएस वाले हे गैरसमज पसरवतात अशी टीकाही यावेळी हार्दिक पटेल यांनी केली आहे.

 

COMMENTS