शिवसेनेनं अनेक कार्यकर्त्यांची घरे उद्ध्वस्त केली – संग्राम जगताप

शिवसेनेनं अनेक कार्यकर्त्यांची घरे उद्ध्वस्त केली – संग्राम जगताप

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार आणि नगर लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मला कसे गोवण्यात येईल याचा नेहमीच शिवसेनेकडून  प्रयत्न केला जातो, तसेच अधिकाऱ्यांवर दमदाटी करून दहशद निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करण्याचा यांचा धंदा आहे. याचा मी गेल्या वर्षी बळी पडलो असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे. यांनी अनेक कार्यकर्त्यांचे घरे उद्ध्वस्त केली. आजपर्यंत प्रत्येकाला वेठीस धरलं, असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय.

दरम्यान  महापालिकेतील आंदोलनादरम्यान शहर अभियंता विलास सोनटक्के यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने बूट फेकून मारला होता. तसेच माजी आमदार अनिल राठोड यांनी चिथावणी देणारे वक्तव्य केल्या प्रकरणी जगताप यांनी अनिल राठोड यांचे नाव न घेता टीका केली आहे.तसेच अभियंत्यावर बूट फेकल्या प्रकरणी आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणीही संग्राम जगताप यांनी केली आहे.

COMMENTS