‘मोदी’ नावावरुन संजय राऊत आणि आशिष शेलारांमध्ये ट्वीटरवर शाब्दिक युद्ध !

‘मोदी’ नावावरुन संजय राऊत आणि आशिष शेलारांमध्ये ट्वीटरवर शाब्दिक युद्ध !

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात ट्वीट युद्ध सुरु झालं असल्याचं पहावयास मिळालं आहे.  मोदी आडनावावरून राऊत यांनी थेट नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणारं ट्विट केलं आहे. त्याला शेलार यांनी ट्विटद्वारेच उत्तर दिलं आहे.

‘ललित मोदी आणि नीरव मोदी हे दोघेही देश सोडून पळून गेले. तिसरा येऊन-जाऊन असतो’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटला शेलार यांनी उत्तर दिलं असून काहींना गल्लीत बसून ‘मोदी’ या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य सूचले. तेव्हाच कळले आता ‘शिमगा’ जवळ आला आहे. वर्षभरच यांचा शिमगा असतो. उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय. तीच थुंकी तोंडावर पडू नये म्हणजे झालं!’, असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS