लोक सोनिया गांधींची भेट घेतात, मग आम्ही पंढरपुरात गेलो तर कुठे बिघडलं ? – संजय राऊत

लोक सोनिया गांधींची भेट घेतात, मग आम्ही पंढरपुरात गेलो तर कुठे बिघडलं ? – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. लोक दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेतात. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोघेही पंढरपुरात गेले आणि विठ्ठलाची भेट घेतली तर बिघडलं कुठे? असं राऊत यांनी म्हटलं आहे. काल राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीवरुन राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करणार आहेत याबाबत त्यांना विचारले असता आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर काय बिघडलं? असं राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच राऊत यांनी इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणी जागवल्या. इंदिरा गांधी या आक्रमक होत्या, त्यांनी देश घडवला. शिवसेना बंद करण्याचा घाट काहीजणांनी घातला होता तो त्यांनी हाणून पाडला. या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार आम्ही आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS