संपूर्ण राज्यात कलम 144 लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय!

संपूर्ण राज्यात कलम 144 लागू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय!

मुंबई  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या कमीत कमी किंबहुना थांबवायची आहे आणि म्हणून उद्या सकाळपासून मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्ये 144 कलम नाईलाजाने लावत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्यापासून पुढचे काही दिवस अधिक दक्षतेने पार पाडायचे आहेत. सातत्याने मी आपल्याला सांगत आहे, आपण आता संवेदनशील टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. उद्यापासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तू चालू राहणार आहेत. वीज पुरवठा, बँका आणि त्यासंबंधी व्यवहार चालू राहतील. पण जिथे वर्क फ्रॉम होम शक्य तिथे करा. सरकारी कर्मचारी संख्या २५ वरुन ५ टक्क्यांवर आणली आहे. केवळ ५ टक्के सरकारी कर्मचारी राज्याचा भार सांभाळणार आहेत. त्यांच्यावर जास्त भार देऊ नका. हे संकट टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या. जीवनावश्यक कामांसाठीच बससेवा चालू राहील. मंदिरं, मशिदी चालू असतील तर ती तातडीने बंद करा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

COMMENTS