सरकारचं काम माझ्या नातवानं केलं – शरद पवार

सरकारचं काम माझ्या नातवानं केलं – शरद पवार

बारामती – जे काम सरकारनं करायला हवं ते मयकाम माझ्या नातवानं केलं असल्याचं कौतुक आज शरद पवार यांनी केलं आहे. राज्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळात तडफडणा-या लोकांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. माझा नातू रोहितने नगरच्या कर्जतमध्ये पाण्याचे टँकर दिले आहेत. हे काम सरकारचं आहे. परंतु ते रोहितने केलं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा आज निरा – पुरंदर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान या देशात काही लोक जागृत असतात. आपल्या प्रश्नांची मांडणी करतात. त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही परंतु त्यांनी दुसर्‍याच्या हिताचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे. हे आजचे सरकार मात्र शेती व शेतकरी यांच्यामध्ये दुर्लक्ष करणारं आहे. मी सत्तेत असो किंवा सत्तेत नसो माझा श्वास असेपर्यंत मी शेतकरी वर्गाच्या पाठीशी राहणार असल्याचंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS