दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही, शरद पवारांनी व्यक्त केली खंत !

दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही, शरद पवारांनी व्यक्त केली खंत !

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील विधानभवनात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. मी पहिल्यांदा सभागृहात आलो होतो भाषण ऐकायला. सभागृहात पायावर पाय ठेवून बसू शकत नाही असा नियम आहे. मी चुकून दुसऱ्यांदा पायावर पाय ठेवला तर मर्शनले पकडून बाहेर काढलं होतं. त्यावेळी त्याला म्हंटल आता जातो पण नंतर येईन तेव्हा कायमसाठी. त्यानंतर राज्यात 26 वर्ष आणि देशात 26 वर्ष सभागृहात काम करायची संधी मिळाली, तसेच “हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकाळात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही”, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या राज्यातील पक्षांतराबाबत चिमटा काढला आहे. काल रात्री माझं जीभ आणि गळ्याचं ऑपरेशन झालं आहे. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका असं सांगितलं आहे. मग म्हटलं सध्याचं राजकारण पाहता मी आज कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शाह यांना भेटायला गेलो. म्हणून थोडा त्रास झाला तरी मी याठिकाणी आलो असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS