‘त्यांचं’ नाव कशाला काढता?, ते इतिहास जमा होणार आहेत – शरद पवार

‘त्यांचं’ नाव कशाला काढता?, ते इतिहास जमा होणार आहेत – शरद पवार

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. पवार यांच्या दौय्राला सोलापुरातून सुरुवात झाली आहे. यावेळी पवार यांनी भाजप सरकार आणि पक्ष सोडून जाणाय्रा नेत्यांवर जोरदार टीका केली. सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात, असं म्हणत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यानाही लक्ष्य केलं. पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजडणाऱ्यांची काळजी घेऊ, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान इतर ठिकाणी काय झालं याची काळजी न करता, इथं सोलापूरमध्ये इतिहास घडवू. सत्ता येते जाते, त्याची काळजी नाही. मी 52 वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झाले. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असाही विश्वास पवारांनी व्यक्त केला.पवारांनी काय काम केलं असा सवाल शाह यांनी केला होता. जे काही केलं ते बरं वाईट केलं, मात्र कधीही तुरुंगात गेलो नाही, असं म्हणत पवारांनी शाहांना टोला लगावला आहे.

COMMENTS