शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, पत्रात काय म्हणालेत शरद पवार ?

शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, पत्रात काय म्हणालेत शरद पवार ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ कृती कार्यक्रम हाती घेऊन दुष्काळात वेळीच पाऊले उचलून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच या पत्रासोबत दुष्काळाशी सामना करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहितीही पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.

दरम्यान पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईमुळे पशूधनही धोक्यात आले आहे, त्यामुळे राज्यसरकारने यावर कृती कार्यक्रम हाती घ्यावा तसेच या कामांकडे मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे अशी अपेक्षा शरद पवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

COMMENTS