लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री, पण ‘त्याची’ भीती वाटते – शरद पवार

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री, पण ‘त्याची’ भीती वाटते – शरद पवार

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच  मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो असून  लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे हा बदल या निवडणुकीत दिसून येणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. आज मुंबईत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम सीपीआय या पक्षांचे नेते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी चंद्रबाबू नायडू यांनीही सरकारवर टीका केली आहे. प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरु असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. प्राप्तिकर विभागाद्वारे भाजपाविरोधकांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. आम्हाला ईव्हीएमबाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव आहे. त्यामुळे याचा परिणाम मतांवरही दिसू शकतो असं वक्तव्य चंद्राबाबू नायडू यांनी केलं आहे.

COMMENTS