‘ती’ खबरदारी दिल्लीत घेतली असती तर हे घडलं नसतं – शरद पवार

‘ती’ खबरदारी दिल्लीत घेतली असती तर हे घडलं नसतं – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील तब्लिगी प्रकरणावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संमेलनाची विनंती धार्मिक संघटनांनी केली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री यांनी विचार करुन ही परवानगी नाकारली. म्हणून ती खबरदारी दिल्लीत घेतली असती तर हे घडलं नसतं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या काळात काळजी घ्या,असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

दरम्यान कोरोनाबाबत मी जे काही टीव्हीवर बघतो. त्यापेक्षा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरचे मेसेज काळजी करण्यासारखे आहेत. त्यातील 5 पैकी 4 मेसेज हे खोटे असतात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच यावर्षी महावीर जयंती, शब्बे-बारात घरातच करा, मुस्लीम बांधवांनी घरातच पूर्वजांचे स्मरण करा. महात्मा फुले जयंतीला ज्ञानदीप लावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संविधानाचा दीप लावून साजरी करुया, गर्दी टाळूया, अंतर राखूया असेही पवार म्हणाले.

COMMENTS