‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला!

‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला!

कोल्हापूर  – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. मोदींनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असं शरद पवार यांनी कोल्हापूर येथील सभेत म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कोणा एकट्या-दुकट्याची नाही. राज्यातील आणि देशातील लक्षावधी कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. हे सारेजण पक्षाची काळजी वाहण्यास तत्पर असल्याने मोदींनी काळजी करू नये. माझ्यावर पंचगंगेच्या पाण्यात वाढलेल्या आईचे संस्कार आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांचा ताबा झाला असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती.  त्यावर पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे. तसेच गांधी घराण्याने देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर आकसाने टीका करणाऱ्या मोदी यांच्याकडून फारशा अपेक्षा करू नयेत, असा सल्लाही यावेळी पवार यांनी दिला आहे.

COMMENTS