शिवसेनेची महत्त्वाची बैठक संपली, ‘या’ विषयावर झाली चर्चा !

शिवसेनेची महत्त्वाची बैठक संपली, ‘या’ विषयावर झाली चर्चा !

मुंबई – शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर घेतली. ही बैठ पार पडली असून या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व मंत्र्यांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात नागरिकांना भीषण दुष्काळाच्या झाळा सोसाव्या लागत आहेत. याच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करावे असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान सरकारने दुष्काळग्रस्त भागात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी होतेय का नाही, याची माहिती घ्यावी. त्यासाठी कॅबिनेट मिटिंगमध्ये आक्रमकपणे जाब विचारा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना मंत्र्यांचा दुष्काळग्रस्त गावातील आढावा रिपोर्ट आल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार आहेत.तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी 2 वाजता शिवसेना भवन येथे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे देखील लक्ष लागलं आहे.

COMMENTS