राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेची दोन व्यंगचित्र !

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेची दोन व्यंगचित्र !

मुंबई  आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यानंतर यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून शिवसेनेला जोरदार टोला लगावला होता. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राला आता शिवसैनिकांनी व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मनसे-शिवसेनेत व्यंगचित्र वार सुरु झाला असल्याचं दिसत आहे.

राज ठाकरेंना प्रत्युत्तर देणारी दोन व्यंगचित्र शिवसेनेनं काढली आहेत. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘तिळगूळ घ्या गोड बोला!’ ‘अरे माझे सगळे लाडू गेले कुठे?’ असा टोमणा पहिल्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंना मारण्यात आला आहे.

तर अंथरुण सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत, अशी बोचरी टीका दुसऱ्या व्यंगचित्रातून करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर उद्धव ठाकरे असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे सोडू? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारतायत. त्यावर ‘अहो पण, आम्ही कुठे धरलंय तुम्हाला’ असं उत्तर फडणवीसांनी दिल्याचं या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी रेखाटलं होतं.

 

COMMENTS