सत्तेत असुनही कामं होत नाहीत, त्यामुळे खासदारकी काय कामाची,  शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा !

सत्तेत असुनही कामं होत नाहीत, त्यामुळे खासदारकी काय कामाची, शिवसेनेच्या खासदाराचा राजीनामा !

मुंबई – राज्यातील शिवसेनेच्या खासदारानं राजीनामा दिला आहे. सत्तेत असुनही काम होत नाहीत. त्यामुळे खासदारकी काय कामाची असं म्हणत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे. खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी फक्त राष्ट्रवादीचीच कामे होतात असा आरोप केला आहे.

दरम्यान शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम होत नसल्याची शिवसैनिकांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेचा पुरेपूर वापर करत आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्त्यांना ताकद देत आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी पाठपुरावा करूनही काहीही झालं नाही.
या समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले आहेत. त्यामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS