युतीतला ताण वाढणार, शिवसेनेच्या ‘या’ जागेवर भाजपचा दावा!

युतीतला ताण वाढणार, शिवसेनेच्या ‘या’ जागेवर भाजपचा दावा!

नागपूर – विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती जवळपास निश्चित झाली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सध्या जागावटपाबाबत चर्चा सुरु आहे. परंतु अशातच युतीतील ताण अजून वाढणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपनं शिवसेनेच्या वाट्याला येणाय्रा जागेवर दावा केला आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या नागपुरातील रामटेकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.विद्यमान आमदार भाजपचा असल्यामुळे रामटेक आणि काटोलची जागा भाजप लढवणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दरम्यान रामटेक या मतदारसंघातून 1999 पासून शिवसेनेचे आशिष जयस्वाल सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेनं हक्क बजावला आहे. परंतु 2014 मधील निवडणुकीत वेगवेगळे लढल्यानंतर रामटेकमध्ये भाजपच्या द्वारम रेड्डी यांचा विजय झाला होता. त्यामुळे आता या जागेवर भाजपनं दावा केला आहे. भाजपच्या या दाव्यावरुन दोन्ही पक्षात तणाव वाढणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS