मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी !

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी !

लातूर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याचं लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु होताच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने गोंधळ करत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान लातूरमध्ये उभारत असलेल्या 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. लातूर शहराजवळील हरंगुळ इथं हा कारखान तयार होतो असून लातूरचा रेल्वे डब्ब्यांचा कारखाना हा सर्वात कमी कालावधीत तयार होणार कारखाना असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या एक ते दीड वर्षात हा रेल्वे बोगीचा कारखाना तयार होणार असून याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

COMMENTS