शेतकय्रांना मोठा दिलासा, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय!

शेतकय्रांना मोठा दिलासा, राज्य सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय!

मुंबई – राज्यातील शेतकय्रांना मोठा दिलासा मिळाला असून थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना देखील खरीपाचे नवं कर्ज मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. शेतकय्रांच्या थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे जवळपास ११ लाख शेतकर्‍यांना नवं कर्ज मिळू शकणार आहे. निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही.कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवं कर्ज मिळणं अवघड आहे. अशावेळी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकय्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. राज्यातील ३२ लाख शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या ३२ लाखांपैकी मार्च २०२० अखेरीस १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपये सरकारने भरले आहेत. परंतु निधी अभावी ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नव्हती.या खातेदारांना ८१०० कोटी लाभ देणे बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS