पाच महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा !

पाच महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा !

भोपाळ  देशातील पाच महाराजांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपशासित राज्य सरकारने या महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला असून या पाच जणांमध्ये भय्यू महाराज यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त सचिव के के काटिया यांच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला असल्याची माहिती आहे. भय्यू महाराजांसोबत नर्मदानंद महाराज, पंडित योगेंद्र महंत, कॉम्प्युटर बाबा आणि हरिहरानंद महाराज, यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

दरम्यान नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी या पाच महाराजांची समिती 31 मार्चला नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य म्हणून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु मध्य प्रदेशात विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला असून या पाच महाराजांना समाजात असलेला आदर लक्षात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने हे पाऊल उचललं असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

COMMENTS