“अण्णांच्या उपोषणावर उद्यापर्यंत तोडगा निघेल,” केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंनी घेतली भेट !

“अण्णांच्या उपोषणावर उद्यापर्यंत तोडगा निघेल,” केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंनी घेतली भेट !

अहमदनगर – केद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. बंद खोलीत तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा पार पडली. परंतु ही चर्चा निष्फळ ठरली असून अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. परंतु उद्यापर्यंत अण्णांच्या मागण्या पूर्ण होणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान केंद्राचा प्रतिनिधी म्हणून भेटण्यासाटी आलो होतो. अनेक मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा झाली. उद्यापर्यंत नक्की मार्ग निघेल अशी खात्री असल्याचं भामरे यांनी म्हटलं आहे. तसेच उद्या समाधान निघेल, त्यांच्याशी अगदी खुल्या मनाने चर्चा केली असल्याचंही भामरे यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकायुक्त संदर्भात नवीन मसुदा तयार करण्याची अण्णा हजारेंची मागणी मान्य केली असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच कृषीमूल्य आयोगाबाबत अद्याप अण्णांचे समाधान झालेले नाही. लोकपाल आणि लोकायुक्तबाबत केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही यावेळी महाजन यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS