फडणवीस चमच्याने दूध प्यायचे, त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते – सुनील तटकरे

फडणवीस चमच्याने दूध प्यायचे, त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते – सुनील तटकरे

पुणे – देवेंद्र फडणवीस ज्यावेळी चमच्याने दूध प्यायचे, त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते अशी टीका सुनील तटकरे यांनी केली आहे. भाजपाच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार असून मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल या शब्दात तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील हल्लाबोल यात्रेदरम्यान ते बोलत होते.

दरम्यान भाजपाने साडेतीन वर्षांत सरकार चालवले की मनोरंजन केले हेच कळत नाही. या कालावधीत या सरकारने लोकांची फसवणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलण्याचा सोयिस्कर कार्यक्रम या सरकारने राबवला आहे. या सरकारला खाली खेचणे आता गरजेचे झाले असल्याचे ते म्हणाले. यावेळी अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. खोटं बोला पण रेटून बोला ही सत्ताधा-यांची कामाची पद्धत असून भोगा आता कमळाची फळं असं बोलण्याची वेळ पुणे करांवर आली असल्याचं अजितदादांनी म्हटलं आहे. तसेच हे सुटबूट वाल्या लोकांचं सरकार असून गोरगरीबांचं सरकार नाही.

 

COMMENTS