केजरीवालांनी अखेर ‘ती’ लढाई जिंकली !

केजरीवालांनी अखेर ‘ती’ लढाई जिंकली !

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर अधिकारांची लढाई जिंकली असून सुप्रीम कोर्टानं त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. प्रत्येक निर्णयात उपराज्यपालांच्या परवानगीची गरज नाही.  उपराज्यपाल दिल्लीचे प्रशासक आहेत. परंतु जनतेनं निवडून दिलेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयात अडथळे आणू नये तसेच प्रत्येक प्रकरणात एलजींची परवानगी आवश्यक नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान उपराज्यपाल हेच दिल्लीचे प्रशासन प्रमुख आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नसल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला होता. त्याविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं केजरवाल यांच्या बाजूने निर्णय दिला असून प्रत्येक निर्णयाला उपराज्यपालांच्या परवानगीची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS