निवडणुका आल्या की यांना असं सुचायला लागते – सुप्रिया सुळे

निवडणुका आल्या की यांना असं सुचायला लागते – सुप्रिया सुळे

कळंब – वीस रुपयात थाळी मिळते का हो? निवडणुका आल्या की यांना असं सुचायला लागते. असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या वचननाम्याची चांगलीच खिल्ली उडवली. उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय निंबाळकर यांच्या प्रचारासाठी त्या कळंब शहरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली.

महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या प्रा. तानाजी सावंत यांचा वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. यापुढे जर महाराष्ट्राच्या विषयी असे वक्तव्य केलात तर महाराष्ट्रात फिरता येणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. बेरोजगारी, वीज, पाणी टंचाईच्या शासनाच्या धोरणावर त्यांनी टीकाही केली.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, उमेदवार संजय निंबाळकर, नगरसेवक अमित शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS