“साडेतीन वर्ष सतत नापास होत असाल तर दादांकडे शिकवणी लावा !”

“साडेतीन वर्ष सतत नापास होत असाल तर दादांकडे शिकवणी लावा !”

अहमदनगर – साडेतीन वर्ष सतत नापास होत असाल तर अजित दादांकडे शिकवणी लावा असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. हल्लाबोल यात्रेच्या तिस-या टप्प्याला आजपासून श्रीगोंदा येथून सुरुवात झाली आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार गेली साडेतीन वर्षांपासून नापास होत आहे. त्यामुळे अजित दादांकडे त्यांनी शिकवणी लावावी असं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेली साडेतीन वर्षांपासून या सरकारनं दिलेलं एकही आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे हे सरकार सतत नापास होत आलं आहे. त्यामुळे सतत नापास होणा-या विद्यार्थ्याला काय म्हणायचं असा सवाल त्यांनी त्यावेळी जनतेला केला. तेव्हा ढ म्हणायचं असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं. त्यामुळे या ढ सरकारनं दादांकडे शिकवणी लावावी असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

 

COMMENTS