तनुश्री दत्ता राज ठाकरेंना म्हणाली गुंड, “राज ठाकरेंना हवी होती बाळासाहेबांची खूर्ची !”

तनुश्री दत्ता राज ठाकरेंना म्हणाली गुंड, “राज ठाकरेंना हवी होती बाळासाहेबांची खूर्ची !”

मुंबई – नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वादाला आता नवं वळण मिळालं असून अभिनेत्री तनुश्री दत्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो असा आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला आहे. तसेच मनसेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, त्यामुळे ते चिडले आहेत त्यांना ‘सरकार राज’ आणायचे आहे स्वतःला सिद्ध करायचे आहे. नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता असून त्याने आणि राज ठाकरेंनी एकत्र येत मला छळलं असल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे.

दरम्यान राज ठाकरे गुंड आहे, त्याने आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत त्यांना तो तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतो असाही आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. नेता तो असतो जो कमकुवत, कमजोर माणसांना संरक्षण देतो. महिलांवर हल्ला करणारा नेता नसतो असंही तनुश्रीने म्हटलं आहे.

तसेच राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच माझी कार फोडली. एवढंच नाही तर नाना पाटेकरांनी मला मनसे कार्यकर्त्यांना हाताशी धरून धमकावण्याचा प्रयत्न केला. नाना पाटेकर कॅरेक्टर आर्टिस्टच राहिला त्याला कोणतीही अभिनेत्री कोणतीही मुलगी भाव देत नाही. त्यामुळे तो मुलींसोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोपही तनुश्रीने केला आहे.

 

COMMENTS