महाराष्ट्रात ‘ते’ शक्य नाही, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मंत्री उदय सामंत यांचं मोठ वक्तव्य!

महाराष्ट्रात ‘ते’ शक्य नाही, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मंत्री उदय सामंत यांचं मोठ वक्तव्य!

मुंबई –  अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या असल्या तरी महाराष्ट्रात हे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीत ऑनलाईन परीक्षा घेतायत, तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला असेल. महाराष्ट्रात सिंधुदुर्गपासून ते गडचिरोलीचा भौगोलिक विचार करता हे शक्य नाही. राज्यात परीक्षा होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. आपत्कालीन समितीने तसा निर्णय घेतला असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ऑनलाइन परीक्षांबाबतीत कुलगुरूंचं मत प्रतिकूल आहे. ग्रामीण भागात निम्म्या ग्रामपंचायतीत इंटरनेट नाही. ऑनलाईन परीक्षा हा महाराष्ट्रात पर्याय होऊ शकत नाही. भौगोलिक विचार करता राज्यात ऑनलाईन परीक्षा शक्य नसल्याचे मत सर्व कुलगुरूंनी नोंदवले असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलता येणार नाही, आम्ही न्यायालयात ही भूमिका मांडली आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS