दोन राजेंचं मनोमिलन नाहीच, शिवेंद्रराजेंचं सूचक वक्तव्य!

दोन राजेंचं मनोमिलन नाहीच, शिवेंद्रराजेंचं सूचक वक्तव्य!

कल्याण –  उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन होणार नसल्याचं दिसून येत आहे. कारण याबाबत स्वत: शिवेंद्रराजे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. उदयनराजेंसोबतच्या मनोमिलनावर बोलत असताना कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून मला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार असल्याचं सूचक वक्तव्य शिवेंद्रराजे यांनी केलं आहे.

तसेच ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे, ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे, अशा लोकांना मी रोखू शकत नाही. त्यांच्या भावनांचा आदर करणं हे माझं काम असल्याचं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे.

तसेच शिवेंद्रराजे यांचे काही समर्थक शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं सांगत मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच या दोन राजांच्या मनोमिलनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. पवारांनी डोकं शांत ठेवा, असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे पवारांच्या शिष्टाईनं दोन राजांचं मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्यावरुन या दोन्ही राजांचं मनोमिलन होणार नसल्याचं दिसत आहे.

COMMENTS