उदयनराजेंचा पुन्हा एकदा राष्ट्रावादीला घरचा आहेर !

उदयनराजेंचा पुन्हा एकदा राष्ट्रावादीला घरचा आहेर !

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रावादीला घरचा आहेर दिला आहे.नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन त्यांनी राष्ट्रावादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रावादीला घरचा आहेर दिला आहे.

काय आहे प्रकरण?

1954 च्या पाणीवाटपानुसार नीरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला 43 टक्के तर उजव्या कालव्यातून सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूरसाठी 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु 2009 मध्ये अजित पवारांनी यात बदल करत बारामतीला पाण्याचा मोठा टक्का देऊ केला. मात्र, आता सरकारने पुन्हा एकदा 1954 च्या पाणीवाटपानुसार पाणी वाटप करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे शरद पवारांना हा मोठा धक्का सरकारनं दिला आहे.

COMMENTS