…तर मी भाजपचा प्रचार केला असता – उद्धव ठाकरे

…तर मी भाजपचा प्रचार केला असता – उद्धव ठाकरे

वसई पालघरमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वसई येथे सभा घेतली. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली असती तर आज मी भाजपचा प्रचार केला असता असं म्हटलं आहे. तसेच वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात प्रचारासाठी उतरलो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रचारासाठी उत्तरप्रदेशवरून माणसं बोलवावे लागतात, साध्या आदिवासी पोराला पाडण्यासाठी तुम्हाला लोक आयात करावे लागतात, हाच भाजपचा पराभव आहे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच भगव्यामुळेच योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी आले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेट लढायचं असेल तर मर्दासारखा लढेन असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मोठे असतील पण, त्यांना भारतात येण्यासाठी वेळच मिळत नाही. सतत परदेशाच्या वाऱ्या करण्यातच त्यांचा वेळ जातो अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

 

COMMENTS