…तर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, उद्धव ठाकरेंचे अजित पवारांना आवाहन!

…तर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, उद्धव ठाकरेंचे अजित पवारांना आवाहन!

उस्मानाबाद – बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचे आदेश देऊन चूक केली असे वाटत असेल तर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा. असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना केली आहे. शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर उस्मानाबाद मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंब तालुका प्रमुख शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष सुरेश साळुंखे, विजय कुमार सस्ते यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका केली. गेली पाच वर्षे शिवसेनेमुळेच राज्यात स्थिर सरकार राहीले, अन्यथा सरकार दोलायमान झाला असतं. आणि जी काम झाली आहेत त्याच्यातही वाटा शिवसेनेचा आहे. इडीकडून शरद पवार, अजित पवार यांच्यावर कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई सुडाची असल्याचा साक्षात्कार त्यांना होतोय. जेव्हा बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश दिले तेव्हा मात्र सूडभावना नव्हती का? असा सवाल त्यांनी यावेळी पवारांना केला. आता दहा वर्षानंतर बाळासाहेबांना दिलेले अटकेचे आदेश चूक होती असं वाटत असेल तर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असे खुले आव्हानच यावेळी ठाकरे यांनी अजित पवार यांना केले.

COMMENTS